किशोर ऑलिम्पियाड मध्ये 'पर्यावरण दिन' साजरा
अन्नाशिवाय काही दिवस मनुष्य जिवंत राहू शकतो पण हवेशिवाय नाही ती हवा शुध्द रूपात मिळावी यासाठी पर्यावरणाचे संवर्धन आणि जतन करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन किशोरच्या संचालिका ज्योती पागडे यांनी केले. किशोर ऑलिम्पियाड अकॅडमीमध्ये आज 'पर्यावरण दिन' उत्साहात साजरा करणेत आला, यावेळी ॲकॅडमीचे को-ऑर्डिनेटर किशोर शिंदे, ऑर्डिनेटर सोनिया पाटील उपस्थित होते. सह को - ज्योती पागडे पुढे म्हणाल्या, आपण निसर्गाचे काही देणे लागतो पर्यावरण प्रदूषण विरहीत ठेवण्याचे काम आपलं आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्यांचे संवर्धन करावे. कारण जगण्यासाठीचा ऑक्सिजन ते आपल्यासाठी देत असतात. याप्रसंगाने अकॅडमीच्या परिसरात तब्बल दिडशे रोपे लावण्यात आली. 'पर्यावरण' या विषयावर विद्यार्थ्यांच्या चित्रकला, पोष्टर, क्राफ्ट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयावर आपली मनोगत व्यक्त केले. मुल्ला सर यांनी पर्यावरण संवर्धन या विषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृत निर्माण करणारे प्रबोधन केली. विभूते मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन अनिता कोळी यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.