शेतकऱ्यांना चार पट मोबदल्यासाठी प्रयत्न : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांना मागील प्रक्रियेनुसार चार पट भरपाई मिळावी यासाठी NHAI च्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळावा यासाठी शासन स्तरावर ठोस प्रयत्न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वसुंधरा शक्ती न्युजसाठी - किशोर जासुद