स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यां वतीने महात्मा गांधी पुतळा परिसरात आमरण उपोषण सुरु

पाणंद रस्ते संदर्भात वारंवार लेखी, तोंडी निवेदने, वेगवेगळी आंदोलने करुनही महानगरपालिका प्रशासन दखल घेत नसल्याच्या कारणावरुन सोमवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्ष यांच्या वतीने महात्मा गांधी पुतळा परिसरात आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.


शेतकरी संघटनेच्या वतीने अनेक वर्षापासून महानगरपालिका हद्दीतील पाणंद रस्ते करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. या संदर्भात बिरनाळे पाणंद, ढोले पाणंद, देवमोरे पाणंद, दिवटे पाणंद, कणसे-माने पाणंद यासह विविध 11 पाणंद रस्त्यांसाठी महानगरपालिकेकडून 16.21 कोटी रुपये खर्चाचे एस्टिमेट तयार करण्यात आले. त्याचबरोबर आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून शासनाने 28 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सदरचे पाणंद रस्ते तातडीने करावेत या संदर्भात प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे. प्रशासनाने या प्रश्‍नाची दखल न घेतल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने नदीवेस येथे रास्तारोकोही करण्यात आला होता. त्यानंतरही प्रशासनाकडून दुर्लक्षच केले गेल्याने सोमवारपासून महात्मा गांधी पुतळा परिसरात शेतकरी संघटनेचे सतीश  मगदूम यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. दिवसभरात आण्णासाहेब शहापूरे, बसगोंडा बिरादार, कुबेर बेडक्याळे, भिमगोंडा पाटील आदींसह संघटनेच्या पदाधिकारी व माजी नगरसेवक संजय तेलनाडे, राजू आलासे आदिंसह लाक्षणिक उपोषण करत पाठींबा दर्शविला.

Post a Comment

Previous Post Next Post