सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आत्मचिंतनाची गरज, जिल्हा परिषद मतदार संघात काठावर पास
राजकीय विद्यापीठ म्हणून गणल्या गेलेल्या कागल तालुक्याच्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कागल विधानसभा मतदारसंघाची निवडणूक दुरंगी झाली,राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे समरजीत सिंह घाटगे अशी अटीतटीची लढत पार पडली. यामध्ये पालकमंत्री मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांचा 11713 मतांनी पराभव केला, हसन मुश्रीफ सहाव्या वेळी पुन्हा विजयी षटकार मारून आमदार म्हणून निवडून आले. यावेळी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी प्रमुख लढत पहावयास मिळाली. कागल विधानसभेची निवडणूक नेहमीच राज्यात लक्षवेधी ठरत असते, राजकीय विद्यापीठ म्हणून गणल्या गेलेल्या या तालुक्यात कधी केव्हा नवा राजकीय टुस्ट निर्माण होईल याचा अंदाज येत नाही, दरम्यान माजी खासदार संजय मंडलिक यांनी आपण महायुतीमध्ये आहोत त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी आपण आहोत असे अनेक वेळा स्पष्ट केले होते. तसेच तालुक्यातील विकास कामांच्या कार्यक्रमांमध्ये मंडलिक हे वारंवार मुश्रीफ यांच्या बद्दल गौरवोद्गार काढून त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचे आवाहन करत होते. मात्र सुरुवातीला संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी तरुणांचा मेळावा घेऊन वेगळी आक्रमक भूमिका मांडली,आणि मुश्रीफांना थांबवून युतीची उमेदवारी आपल्याला मिळावी अशी मागणी केली होती. तसेच यापूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडीचा आढावा घेऊन नामदार मुश्रीफ यांच्यावर राजकीय आरोप देखील केले होते. पण शेवटच्या टप्प्यात ते नामदार मुश्रीफाच्या बरोबर राहिले माजी आमदार संजय घाटगे यांनी निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच मंत्री मुश्रीफ यांना पाठिंबा दिला होता. निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ यांनी त्यांना जिल्हा बँकेच्या संचालक पदी नियुक्ती केली होती.या सर्व गोष्टी जरी खरे असल्या तरी नामदार मुश्रीफ साहेबांनी कापशी जिल्हा परिषद मतदार संघात प्रत्येक 25 गावांना 15 कोटी पासून 25 कोटी पर्यंत विकास निधी दिला होता.शिवाय आपल्या सहकाऱ्यांच्या मार्फत विविध शासकीय योजनांचे कॅम्प मोठ्या प्रमाणात गावोगावी घेऊन त्याचा फायदा लोकांना करून दिला होता. उदाहरणार्थ माझी लाडकी बहीण योजना, बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी वाटप, बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, संजय गांधी योजना, आरोग्यविषयाच्या अपंगांच्या योजना,याशिवाय कार्यकर्त्यांना व्यक्तिगत शासकीय मदत मिळवून दिली होती. जेणेकरून आपला कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे ही साहेबांची भूमिका होती. शिवाय या मतदारसंघात सरसेनापती संताजी शुगर कारखान्याची उभारणी करून हरितक्रांतीचा पाया रोवला होता, या कारखान्याच्या माध्यमातून हजारो बेरोजगार युवकांना हाताला काम मिळवून दिले होते, शिवाय शेतकऱ्यांच्या ऊसाची वेळेत उचल करून, त्यांच्या ऊसाला इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव दिला, इतका प्रचंड कामाचा डोंगर उभा करून देखील कापशी जिल्हा परिषद मतदार संघात केवळ मुश्रीफ साहेबांना फक्त 1288 मताचे मताधिक्य मिळाले.कापशी जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे दोन गण येतात. त्यापैकी माद्याळ गणात मुश्रीफ साहेबांना 1140 मताचे मताधिक्य मिळाले.आश्चर्य म्हणजे या पंचायत समितीच्या गणात संताजी शुगर कारखाना येतो या भागातील बेरोजगारी हटवून युवकांच्या हाताला काम मिळवून देऊनही मुश्रीफ साहेबांना कार्यकर्ते मोठं मताधिक्य देऊ शकले नाहीत ही चिंतेची बाब आहे, तर कापशी पंचायत समिती मतदार संघात फक्त दीडशे च्या आसपास मताधिक्य मिळाले आहे. याचाच अर्थ कुठेतरी कापशी जिल्हा परिषद मतदार संघात प्रामाणिक कार्यकर्त्याची घुसमट होती की काय? हा संशोधनाचा विषय आहे.मुश्रीफ गटातील गाव गड्या वरील पुढाऱ्यांच्या वरती प्रचंड नाराजीचा सूर आहे. आमचा नेता"विठ्ठल आहे पण त्यांच्याभोवती असलेल्या बडव्यांच्यावर आमचा राग आहे"असे कार्यकर्ते उघडपणे बोलताना दिसत आहेत.युवानेता सरपंच व डेपोटी आणि चेअरमन म्हणून मिरवणाऱ्या पुढाऱ्यांना गावात कोणी हिंग लावून पण विचारत नाहीत,गावात त्यांच्या संस्थेचा ठाव ठिकाणा पण नाही, संस्थेचे ऑफिस कुठे माहित नाही,संचालक कोण आहेत माहित नाही, एवढेच काय? तर त्यांच्या घरात त्यांना कोण विचारत नाही, केवळ निवडणुका आल्या की अर्थात जनासाठी सारी नेत्यांच्या पुढे पुढे करायचे आणि पोळी भाजून घ्यायची असा पांडाच जणू या गावगड्यातील स्वयंघोषित पुढाऱ्यांनी पाडला आहे. वेळेत याचा बंदोबस्त करून,नवीन व जुन्या प्रामाणिक कार्यकर्त्याला गावागावातून संधी देऊन हा मतदार संघ मुश्रीफ साहेब पुन्हा सुरक्षित करून सावरू शकतात. असे अनेक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे प्रमुख कार्यकर्ते त्यांच्यामधील धूसमुस तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मध्ये जाण्या अगोदरच, अशा स्वयंघोषित पांढरपेशी पुढार्यांना लगाम घालण्याची व्यवस्था साहेबांनी करावी,अशी मागणी प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या मधून होताना दिसत आहे. त्यातच पुढील वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यामुळे महायुतीला पोषक वातावरण असल्याने पुढील सहा महिन्याच्या आतच या निवडणुका घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
*"चौकट"*
लाडकी बहीण योजना मुळची मध्य प्रदेशातली शिवराज सिंह चौहान यांच्या सुपीक डोक्यातून निघालेली ती मध्यप्रदेशामध्ये जेवढी गाजली तेवढीच, महाराष्ट्रात यशस्वी झाली यामागे फायद्या तोट्याची गणित होती. पण त्याचबरोबर राज्यातल्या महिला शक्तीला महायुतीच्या मागे उभा करण्याची मोठी शक्कल महायुतीने लढवली होती.जी यशस्वी ठरली आहे. अनेक जण असेही म्हणतात स्त्रिया स्वतःचा निर्णय काय? स्वतः घेत नाहीत,घरातील प्रमुख सांगतो त्यालाच ते मतदान करतात पण यंदा काय? तसे झाले नाही.यंदा या लाडक्या बहिणींनी मागच्या वेळेपेक्षा आठ टक्के जास्त मतदान करून गेल्या. सुमारे अडीच कोटी महिला मतदारांपैकी जवळपास 70 ते 75 टक्के मत या लाडक्या बहिणींची थेट महायुतीलाच पडली आहेत. तर एका बाजूला "बटेंगे तो कटेंगे"ही चाललेली घोषणा शाहूंच्या पुरोगामी कागल मतदार संघात फारशी यशस्वी झाली नाही,तर अजितदादांचा"एक है तो सेफ है"हा नारा कमालीचा यशस्वी ठरला. म्हणूनच कागलच्या मैदानात पालकमंत्री मुश्रीफ साहेबांना विजयाचा षटकार ठोकता आला. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही..!
वसुंधरा शक्ती न्यूज प्रतिनिधी :- यशवंत पाटील