डॉ.राहुल आवाडे यांच्या विजयात राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे विशेष योगदान ; सुभाष मालपाणी
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा राजकीय केंद्रबिंदू आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने गेल्या काही वर्षांत सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण योगदान दिले असून नूतन आमदार डॉ.राहुल प्रकाश आवाडे यांना निवडून आणण्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचेही महत्वपूर्ण योगदान असल्याचे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले ते पुढे म्हणाले अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात अनेक प्रकल्प राबविण्यात आले असून पाणीपुरवठा सुधारणा, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती व विस्तार, तसेच शेतकऱ्यांसाठी जलसंधारण प्रकल्प यासारख्या योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळाला असून, शेती उत्पादनक्षमता वाढली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसायातील असलेले प्रश्न त्यामध्ये प्रामुख्याने विजेचे दर व त्यावरील आकारणी करण्यात येणारे व्याज यामध्ये सवलत देऊन वस्त्र उद्योग व्यवसायाला जीवदान दिले आहे शिक्षण क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार व सामाजिक न्याय विभागांतर्गत बांधकाम कामगार यांना सर्व आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा बाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणि कौशल्य विकास योजने मधून त्यांना सक्षम करणे सुर या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा दिली आहे. राज्यातील सर्व स्तरावरील नागरिकांना आरोग्य उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता योजना मधून आर्थिक सहाय्य करण्यात आलेले आहे. केवळ विकास प्रकल्पांवरच भर दिला नाही तर मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहून विश्वासाचे नाते तयार केले आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे योगदान निर्विवादपणे महत्त्वाचे ठरते. यामुळेच येणाऱ्या काळात या मतदारसंघात अजित पवार गटाची माननीय नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली व सहकार्याने राजकीय ताकद अधिक मजबूत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब देशमुख, निहाल कलावंत, ललित झंवर, सूर्यकांत कडोलकर, संदीप शिंदे, मोहम्मद जमादार, सुनील पाटील, अथर्व जाधव, दिलावर पटेल आदी उपस्थित होते.