बेताल वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर कारवाई करा - इनामचे उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यलायास निवेदन

बेताल वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर कारवाई करा - इनामचे उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यलायास निवेदन 


इचलकरंजी शहराची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून बेताल वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यलायात देण्यात आले. दोन दिवसांपूर्वी माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वाळवा येथे एका कार्यक्रमात बोलताना इचलकरंजी शहराचा पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख केला, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यात त्यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी वादळात दिवा लावला, इचलकरंजी सारख्या पाकव्याप्त काश्मीर सारख्या ठिकाणाहून ते निवडून आले आहेत असे वक्तव्य केले.विद्यमान खासदार व्यासपीठावर उपस्थित असताना त्यांनी याबाबत कसलीही प्रतिक्रिया दिली नाही हे शहरवासीयांचे दुर्देव आहे. याबाबत नागरिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.इचलकरंजी शहर हे संवेदनशील शहर आहे याची झळ २००९ सालीच्या दंगलीने शहरवासीयांनी भोगली आहे,त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या सावध भूमिकेने आजपर्यत शहरात शांतता प्रस्थापित करणे शक्य झाले,येथे अठरापगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. विद्यमान खासदार हे लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले असताना इचलकरंजी शहरास पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणे हे शहराची शांतता भंग करून दंगलखोरांना प्रोत्साहन देणारे वक्तव्य आहे तसेच हा इचलकरंजी शहरातील ४ लाख नागरिकांचा अपमान आहे. याचा दूरगामी परिणाम इचलकरंजी शहरावर होऊ शकतो असे निवेदनात म्हंटले असून वाचाळवीर हर्षवर्धन पाटील यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.७ दिवसात आपण कारवाई न केल्यास आम्हाला वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवीण परीट व सागर हारगुले यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे राजु कोन्नुर, राम आडकी, महेंद्र जाधव, हरीश देवाडिगा, विद्यासागर चराटे, विशाल चितपुरे, अमित बियाणी, उमेश पाटील, राजेश बांगड, उदयसिंह निंबाळकर, अभिजित पटवा आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post