महापुर आल्यास संबंधित ग्रामस्थानी सुरक्षा स्थळी स्थलांतरित व्हावे ; बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे आवाहन
बेळगावसह कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होणारा सततधार पाऊस या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला असून बेळगाव जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 427 या काळजी केंद्रांना भेट देऊन तयारी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे याबाबत प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आज सकाळपासून अलमट्टी जलाशयातील पाण्याचा विसर्ग किमान दोन लाख क्विसेस पर्यंत वाढविण्यात आला असून बेळगाव जिल्ह्या बरोबरच महाराष्ट्रातून येणाऱ्या नदीच्या पाण्यासंदर्भात 24 तास लक्ष ठेवले जात आहे अशी माहिती बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. गेले आठ दिवसापासून कोकण व कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा मुसळधार पाऊस सतत कोसळत आहे. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आले आहेत. याशिवाय नवीन बोटी नेहमी तत्पर ठेवाव्यात, गरज पडल्यास बोटी भाड्याने घेण्यासाठी पावले उचलावीत. नवीन पाच बोटी खरेदी केल्या जाणार असून अग्निशम दलाच्या जवानांना देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी संबंधित नदीकाठच्या गावाची तहसीलदाराकडून माहिती घेतल्यानंतर कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा, दूधगंगा व वेदगंगा नदीकाठच्या पूरग्रस्त गावांमध्ये संबंधित तहसीलदार, नोडल अधिकारी, अग्निशामक अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी सतत दक्षता ठेवावी याबाबत सूचना देण्यात आले आहेत. कर्नाटकातील मंगावती जुगुळ, शिरगुपी, कुसनाळ बालाजीवाडा, मुळवाड उगार येडूर, मांजरी, झुंजारवाडी नागनूरपिके, भीलवाडा भिवशी, कोडणी, भोज व बारवाड, कारदगा गावच्या परिस्थितीवर प्रशासनाचे सतत लक्ष ठेवण्यात येणार आहे. संभाव्य महापूरात येणाऱ्या नद्यांच्या परिसरातील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन त्यांच्यावर प्रशासनाने लक्ष ठेवण्यात यावे,व गेल्या आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यात खड्डे पडले असल्यास त्वरित ते बुजवावे अशी सूचना बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार बैठकीत दिले.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे