देव दर्शन घेऊन परताना झालेल्या ट्रक व मिनी ट्रव्हलरच्या भीषण अपघातात 13 जण ठार ; पुणे बंगलोर राष्ट्रीय मार्गावरील दुर्घटना

देव दर्शन घेऊन परताना झालेल्या ट्रक व मिनी ट्रव्हलरच्या भीषण अपघातात 13 जण ठार ; पुणे बंगलोर राष्ट्रीय मार्गावरील दुर्घटना 


कर्नाटकातील हावेंरी नजिक बेंगळूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर बागडी तालुक्यातील गुंडेनहळ्ळी क्रॉसजवळ झालेल्या भीषण अपघातात  सौदत्ती येथील यल्लमा देवदर्शनासाठी आलेल्या १३ भाविकांचा मृत्यू झाला आहे. भाविकांच्या खासगी ट्रवेलर वाहनाची राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात चालकाला झोप आल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटणा स्थलावरून मिळालेली अधिक माहिती अशी की दक्षिण भारतातील जागृत देवस्थान म्हणून सोऊंदत्ती याल्लंमा मंदिर प्रसिध्द आहे. हवेरी येथील भाविक दर्शन घेऊन परत येत असताना चालकाच्या निष्काळजी पणामुळे रस्त्यात थांबलेल्या ट्रकला पाठीमागे जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये 13 भाविक ठार झाले. मृतांमध्ये वाहनातील ७ महिलांसह १३ जणांचा समावेश आहे. तर जखमी झालेल्या चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परशुराम (वय ४५), भाग्या (४०), नागेश (५०), विशालाक्षी (४०), अर्पिता (१८), सुभद्राबाई (६५), पुन्या (५०), मंजुळाबाई, चालक आदर्श (२३), मानस (२४), रूपा (४०), मंजुळा (५०) (सर्वजण रा. एमेहट्टी ता. भद्रावती, जि. शिमोगा) अशी मृतांची नावे आहेत.या बाबत सविस्तर माहिती अशी की अपघातातील मृत व्यक्ती हा नागेश आहे. नागेशची पत्नी विशालाक्षी या आशा कार्यकर्त्या होत्या.विशालाक्षीचाही या घटनेत मृत्यू झाला. नागेश आणि विशालाक्षी यांचा मुलगा आदर्श याने नवीन टेम्पो ट्रॅव्हलर वाहन घेतले होते. त्या वाहनाची पूजा करण्यासाठी गेलेले हे कुटुंब सोमवारी दुपारी १२ वाजता कलबुर्गी जिल्ह्यातील चिंचोली येथील मायाम्मा मंदिरात गेले. तेथे वाहन पूजा केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र तुळजा भवानी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे आल्यानंतर येथील यल्लम्मा (रेणुका) देवीचे दर्शन घेऊन गावीपरतताना हा अपघात झाला.यामध्ये अनेक उच्च शिक्षित होते. एमेहट्टी गावातील १३ जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरली आहे. कर्नाटक सरकारचे  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. 

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन- अजित कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post