सत्यजित पाटील यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया ; भाऊसो कसबे

सत्यजित पाटील यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया ; भाऊसो कसबे


आपण आपले जीवन चांगले जगायचे की नाही हे ठरवण्याची ही निवडणुक आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्याची हमी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर हे देत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना पाठींबा जाहीर करत त्यांना मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन लाल बावटा शेतमजुर युनियनचे जिल्हाध्यक्ष भाऊसो कसबे यांनी केले. रेणुकानगर झोपडपट्टीत झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. कसबे म्हणाले, वाढती महागाई, बेरोजगारीमुळे कष्टकरी, कामगारांना संसार चालवायचा कसा असा प्रश्‍न पडला आहे. मात्र सरकार कर स्वरुपाने 10 पटीने काढून घेऊन 5 वर्षे मोफत धान्याचे अमिष दाखवत आहे. गेल्या 10 वर्षात तर जनतेचा भ्रमनिरास झाला असून आजी-माजी खासदारांनी केवळ जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांना दिलेल्या आश्‍वासनाचे काय झाले ? याचा जाब विचारण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे स्वार्थी आणि जातीपातीचे राजकारण करणार्‍यांना याच निवडणुकीत नव्हे तर आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकीतही घरी बसवण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी केंद्र आणि राज्य सरकार गोरगरीबांच्या हिताचे नव्हे तर भांडवलदारांच्या हिताचे धोरण अवलंबत आहे. त्यामुळे गरीब आणखी गरीब तर श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहे. जनतेच्या हितासाठी अब की बार 400 पार नव्हे तर लोकशाही मोडीत काढण्यासाठी, संविधान बदलण्यासाठी बहुमत हवे आहे. शहरातील रेणुकानगरसह सर्वच झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी घरकुलाचा प्रस्ताव काँग्रेसने आणला होता. मात्र त्याला भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विरोध केला. या सर्व गोष्टींचा विचार करून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी वत्सला भोसले, सदा मलाबादे, शिवाजी साळुंखे, शिवाजी शिंदे यांनी रेणुकानगरमधील घरकुलाचा प्रश्‍न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे सत्यजित पाटील यांना निवडुन देऊन प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावुया असे सांगितले. सभेस अजित मिणेकर, रवि वासुदेव यांच्यासह भागातील नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post