इचलकरंजी महापालिकेने लोकप्रतिनिधींकडून पाणीपट्टी वसूल करावी आप'चे निवेदन
■ नागरिकांना दररोज स्वच्छ व पुरेसे पाणी मिळण्याचा अधिकार आहे. मात्र सध्या शहरात चार ते आठ दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. शहराच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असताना ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी नागरिकांकडून वसूल न करता ती लोकप्रतिनिधींकडून वसूल करावी, या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीतर्फे उपायुक्त तैमूर मुलानी यांना दिले.या शिष्टमंडळात अभिषेक पाटील, गोरख हत्तीकर, कुणाल बागडे, सलीम गवंडी, गजानन सुतार आदी सदस्य उपस्थित होते.