महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या समर्थनार्थ खासदार सुप्रियाताई सुळे यांचा महिला मेळावा संपन्न

महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या समर्थनार्थ खासदार सुप्रियाताई सुळे यांचा महिला मेळावा संपन्न 


इचलकरंजी येथील स्थानिक अपक्ष आमदारावर भाजप सरकारने 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीआधी 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलाचा आरोप केला होता. त्यांनाच पक्षात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे असा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव न घेता खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले. इचलकरंजी येथील काँग्रेस कमिटीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या समर्थनार्थ खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, दोन हजार कोटी रुपये खर्च करून ते उधळत महाविकास आघाडीचे सरकार पाडले. हे सरकार इन्कम टॅक्स सीबीआय व ईडीवर चालणार सरकार आहे असा आरोपी सुळे यांनी केला. भ्रष्टाचार मुक्त भारत असे या सरकारने म्हटले होते. परंतु, भ्रष्टाचारीच आमदार भाजप आपल्या पक्षा मध्ये घेत असल्याचा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला. हाच मुद्दा पकडत ज्या अपक्ष आमदारावर भाजपने 200 कोटी रुपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. 


त्याच आमदाराला भाजपने आपले तिकीट दिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच महाविकास आघाडीचे सरकार राज्यसह केंद्रात आले तर भ्रष्टाचार मुक्त भारत करणार असे आव्हान ही सुळे यांनी केले. दरम्यान, लोकसभेला महाविकास आघाडीला जनतेने मोठा प्रतिसाद दिल्यानंतर महायुती सरकारला लाडकी बहीण योजना आठली असल्याचा आरोपी सुळे यांनी यावेळी केला. नगरसेवक म्हणून निवडून आलेले मदन करंडे यांना यावेळी आमदार करा ते शहराचा महत्त्वाचा असा पाणी प्रश्न निवडून आल्यानंतर विधानसभेमध्ये ते सोडून देतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये कोरोना सारख्या महामारीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चांगले काम केले. दरम्यान,अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर भाजप पक्षाने आधी उद्धव ठाकरे यांचे त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार फोडले. परंतु, त्यांना नागरिकांचे मत फोडता आले नाही. त्यामुळेच त्यांना जनतेने लोकसभेमध्ये त्यांची जागा दाखवली. लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या यशानंतर त्यांना विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकावी लागली आणि विधानसभेत पराभव होईल या उद्देशानेच महिलांना रक्षाबंधन योजना आणावी लागली. तरीही महाविकास आघाडीला विधानसभेत मोठे यश मिळेल असे आश्वासन मदन कारंडे यांनी दिले. तसेच तारदाळ व खोतवाडी या गावालाही पिण्याच्या पाण्याची अडचण होत होती. परंतु , त्या ठिकाणीही एक दिवस आड पाणी देण्याचे काम आपण केले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी हिंदुराव शेळके, काँग्रेसचे राहुल खंजिरे, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, माजी नगराध्यक्ष मेघा चाळके, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सयाजी चव्हाण, माजी नगरसेवक उदयसिंग पाटील,  अब्राहम आवळे, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post