इचलकरंजीचा विकासासाठी राहुल आवाडे यांचा विजय निश्चित ; केंद्रिय मंत्री नितीन गडकरी
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ भव्य ऐतिहासिक निर्धार सभा गावचावडी समोरील चौक, शहापूर, इचलकरंजी येथे संपन्न झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.ना.श्री. नितीनजी गडकरी, खासदार मा.श्री.धैर्शयील माने, आमदार मा.श्री.प्रकाशआण्णा आवाडे, भाजपा विधानसभेच्या निरीक्षक, आमदार सौ.शशिकला जोल्ले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष मा.श्री.अशोक स्वामी, क.आ. जनता बँकेचे चेअरमन मा.श्री.स्वप्निलदादा आवाडे, सौ.मोश्मी आवाडे वहिनी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.सभेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आदरणीय मा.ना.श्री. नितीनजी गडकरी होते. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून त्यांनी इचलकरंजीसाठी नवी स्वप्ने उभी केली. आपल्या भाषणात त्यांनी इचलकरंजीसाठी असलेल्या योजनांचा उल्लेख करत सांगितले की, इचलकरंजीचा विकास हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. इथल्या विकासासाठी निधीची कमतरता कधीच पडू देणार नाही. मी तुम्हाला विश्वास देतो की, येणाऱ्या काळात इचलकरंजी हे देशातील प्रगत शहरांपैकी एक असेल. त्यांच्या या शब्दांनी जनतेच्या आशा अधिकच बळकट केल्या. तसेच आमदार मा.श्री.प्रकाशआण्णा आवाडे यांनी महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजना बाबतीत माहिती दिली त्याचबरोबर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.ना.श्री.नितीनजी गडकरी यांना इचलकरंजी मध्ये असलेल्या समस्या येणाऱ्या अडचणी सांगितल्या व आपल्या मनोगतातून इचलकरंजीच्या हितसंबंधी अनेक मागण्या केल्या. याप्रसंगी मान्यवरांनी इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या एकजुटीची ताकद कशी फायद्याची ठरणार आहे, हे स्पष्ट केले. रोजगार निर्मिती, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, शेती आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे इचलकरंजी शहर विकासाच्या मार्गावर झेप घेण्याचा विश्वास जनतेला दिला. आपण सर्वांनी दाखविलेला अपार विश्वास आणि साथ हीच आमची प्रेरणा आहे. इचलकरंजीत आता फक्त कमळच फुलणार हा नारा साकारण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आणि सहकार्याची गरज आहे. एकत्र येऊया, इचलकरंजीचा विकास करूया आणि इचलकरंजीला एक नवीन उंचीवर नेऊया.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी.एम.पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, जि.प.सदस्य प्रसाद खोबरे, कामगार नेते मिश्रीलाल जाजू, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, भाजप शहर अध्यक्ष पै.अमृतमामा भोसले, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, अनिल डाळ्या, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शिवसेना शहर अध्यक्ष भाऊसाहेब आवळे, दादासो भाटले, चंद्र्शेखर शहा, रणजित अनुसे, दिलीप मुथा, राजेश रजपूत, सतीश डाळ्या, बाळकृष्ण तोतला, सतीश मुळीक, सुभास मालपाणी, दिपक राशिनकर, जयेश बुगड, ताराराणी महिला अध्यक्षा सौ.उर्मिला गायकवाड, भाजप महिला अध्यक्षा सौ.अश्विनी कुबडगे, शितल शिंदे, भाजप महिला सरचिटणीस सौ.रमा फाटक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.