करवीर तालुक्यातील "यु.पी. गँग" सहा महिन्या करीता कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार

करवीर तालुक्यातील "यु.पी. गँग" सहा महिन्या करीता कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार 


कोल्हापूर जिल्हयातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणा-या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटणासाठी गुन्हेगारावर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर एमपीडीए तसेच हद्दपारीची कारवाई करणे बाबत मा. महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत. करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्हयाचे परिसरामध्ये सार्वत्रिक हितास बाधक अशा स्वरुपाचे गुन्हयांना परिणाम देणा-या "यु.पी. गैंग " या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख उमेश खंडेराव पाटील, रा.प्लॉट न.२७ गणेश कॉलनी, आदित्य अपार्टमेंट, सानेगुरुजी वसाहत कोल्हापूर ता. करवीर, जि. कोल्हापूर, संजय दशरथ कांबळे, रा.स्मशान भुमीजवळ म्हसोबा हॉल जवळ, कळंबा, ता.करवीर, जि. कोल्हापूर, राजेंद्र दिनकर गायकवाड, रा.शाहुगल्ली कळंबा ता.करवीर, जि.कोल्हापूर, रविंद्र सदाशिव सुतार, रा.१२८५ डी वॉर्ड, उत्तरेश्वरपेठ, कोल्हापूर ता.करवीर, जि. कोल्हापूर, मिलींद मोहनराव घरपणकर, रा.८६१ ए वॉर्ड, गोरक्षनाथ मठासमोर, बापुरामनगर कळंबा ता. करवीर, जि.कोल्हापूर. यानी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधीत झालेले सामाजिक स्वास्थ पुनःप्रस्थापित करण्यासाठी, पोलीस निरीक्षक, करवीर पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे टोळी हद्दपारीच प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी, श्री महेंद्र पंडित साो यांचेकडे सादर केला होता. कोल्हापूर जिल्हयाचे मा. हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक, श्री महेंद्र पडित सारे यांनी सदरच्या प्रस्तावांची निःपक्षपातीपणे चौकशी होणे करीता चौकशी अधिकारी म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांची नियुक्ती केली होती. त्यानी चौकशीअंती अहवाल मा.हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांचेकडे सादर केला होता. चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर वेळावेळी मा.हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांचे समक्ष घेणेत आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजु माडंणेसाठी नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी दिला होता. घेणेत आलेल्या सुनावणीमध्ये, त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातुन टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत माजविणे व सामाजीक स्वस्थ्यास वाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, नागरीकांचे जिवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रीक हित लक्षात घेवुन, हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, मा.महेंद्र पंडित सारे यांनी दिनांक १२/११/२०२४ रोजी "यु.पी. गैंग" या टोळींचे प्रमुखासह ५ इसमांना कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतुन सहा महिन्याचे कालावधी करीता हद्दपारीचे आदेश पारित केले. पारित केलेल्या आदेशाची करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक यांनी अमंलबजावणी केली. हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्हयामध्ये कोणाला दिसून आल्यास नजीकचे पोलीस ठाणेस अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क करुन माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post