अवकाळी पावसामुळे भाताचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ; जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे संस्थेची मागणी
जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे सामाजिक संस्था कोळींद्रे यांच्या वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले या निवेदनात अवकाळी पावसामुळे भात शेताचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी लवकरात लवकर सर्वे करून नुकसान भरपाई मिळावी असे या निवेदनात म्हटले आहे. सदरचे निवेदन नायब तहसीलदार मासाकांत देसाई यांनी स्वीकारले. यावेळी शेतकऱ्यांच्या भात शेतीचे झालेल्या नुकसानाबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी समाजसेवक नरसू शिंदे, आनंद सुतार, रानोजी पाटील, वसंत पवार, भिकाजी गोंधळी, अमर मटकर आदि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.