चिक्कोडी लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय होईल ; खास.अण्णासाहेब जोल्ले
लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान झाले होते. यामध्ये खरी लढत भाजप व काँगेस यांच्यात झालेली दिसून आली. केंद्रातील मोदी सरकारने विकास योजना राबवित देश बलशक्ती बनविण्याचा प्रयत्न केला आहे.या विकास कामा पोटी जनता भाजपच्या विकासकामांवर प्रभावित होऊन लोकसभा निवडणूकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे चिक्कोडीत भाजपचा विजय निश्र्चित आहे असे मत खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली. ते भारतीय जनता पार्टी चिक्कोडीच्या वतीने एकसंबा शहरात "लोकसभा निवडणूक आढावा बैठक' व मतमोजणी अभिकर्ता कार्यशाळा बैठक" संपन्न झाली त्याप्रसंगी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. बैठकीत ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी करावयाच्या कामांवर चर्चा करण्यात आली. केंद्रात मोदींचे नेतृत्वखाली सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असे मत जोल्ले यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार दुर्योधन ऐहोळे, माजी मंत्री व निपाणी आमदार सौ शशिकला जोल्ले, माजी आमदार महेश कुमठळ्ळी, चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष सतीश आप्पाजीगोळ, उपाध्यक्ष, जोल्ले उद्योग समूहाचे संचालक मंडळ, सदस्य, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे चेअरमन एम बी पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील,संचालक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहून अजित कांबळे.