वृक्षारोपणाचे नियोजन करा ; पर्यावरणदूत राजू नदाफ यांची मागणी
वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यासाठी नियोजन करावे, या मागणीचे निवेदन पर्यावरणदूत राजू नदाफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे. यावर्षीचे उन्हाळ्यातील तापमान ४० डिग्रीपर्यंत गेले असून यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड कारणीभूत आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्हयातील ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांना सक्तीने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्यासाठी सक्तीचे आदेश द्यावेत. तसेच ज्या नागरीकांनी स्वतःच्या घरासमोर वृक्ष लावले आहेत. त्यांना घरफाळयामध्ये विशेष सुट देऊन वृक्षारोपणाच्या स्पर्धा आयोजित करुन बक्षीसेही जाहीर करावीत, अशी ही मागणी त्यांनी केली आहे.