इचलकरंजी शहर काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशासाठी बहुमुल्य योगदान दिले असून त्यांनी नव्या तंत्रज्ञानाची मुहुर्तमेढ रोवली. त्यांच्या सुधारणावादी कामातून आधुनिक विचारांचा पगडा पहायला मिळाला. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक असलेल्या राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे हीच खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपासन प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शशांक बावचकर यांनी केले. इचलकरंजी शहर काँग्रेसच्यावतीने आयोजित राजीव गांधी स्मृतिदिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी काँग्रेसचे कार्यकर्ते दशरत जावळे यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बावचकर यांनी राजीव गांधी यांनी देशासाठी दिूलेले योगदान आणि तंत्रज्ञानाची मुुहर्तमेढ रोवल्याविषयी प्रबोधन केले आणि येणार्या काळात देशाच्या सत्तेत परिवर्तन होईल, असे आश्वस्त केले. यावेळी बाबासाहेब कोतवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अरविंद धरणगुत्तीकर, अजित मिणेकर, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, रविराज पाटील, प्रविण फगरे, सचिन साठे, शबाना नदाफ, मीरा कुलकर्णी, महानंदा हिरेमठ, जोत्सना भिसे, बिस्मिल्ला गैबान, सुदाम साळुंखे, ओकार आवळकर, रमजान शिकलगार, मारुती कोरवी, अनिल पचिंद्रे, राजू किणेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
