शहर व परीसातील वाढत्या चोरीच्या प्रकाराबाबत भाजपाचे DYSP यांना निवेदन
शहरातील विविध भागात तसेच आसपासच्या गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र कायम आहे. कालच जवाहरनगर परिसरात तब्बल ५ ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. त्यामध्ये ३ ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला तर तर २ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. याप्रकारामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. सदरची चोरी पाळत ठेवून केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून चोरटे सीसीटिव्ही कैद झाले आहेत. अशा प्रकाच्या धाडसी चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे, यामुळे नागरिक घर बंद करून परगावी जाण्यास घाबरत आहेत. अशा प्रकारावर आळा घालावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी आणि इचलकरंजी परिसरातील नागरिकांना भयमुक्त करावे त्याच प्रमाणे आठवडी बाजारामध्ये महिलांचे दागिने, नागरिकांचे मोबाईल चोरीचे सुद्धा प्रमाण वाढले आहे यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनने आपापल्या हद्दीतील आठवडी बाजारात पोलीस तैनात करावेत असे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सामिर्सिंह साळवे साहेबांना देण्यात आले. यावेळी शहराचे अध्यक्ष पै. अमृत मामा भोसले, सरचिटणीस बाळकृष्ण तोतला, सरचिटणीस राजेश राजपूते, विधानसभा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे, शहर उपाध्यक्ष प्रदीप माळगे, उपाध्यक्ष सचिन माळी, अतुल गोरे, लालचंद पारीख, नरेंद्र पोटे, भानुदास तासगावे, रामदास कोळी, आनंद पारीख, अशोक बारमोडे, वैभव शेट्टी, शिवाजी पन्हाळकर, मनीष आपटे, मिलिंद दोडेकर, विजय हलूरवट, प्रदीप कांबळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थीत होते.