इचलकरंजी येथील आचार्य अकॅडेमीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
इचलकरंजी येथील आचार्य अकॅडेमीमध्ये गुरु पौर्णिमा उत्साहात पार पडली यावेळी या कार्यक्रमासाठी आकॅडेमीचे संस्थापक अध्यक्ष श्री.आनंदा खोंद्रे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर संचालिका सौ.सीमा खोंद्रे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुजनांचे पाद्य पूजन केले. भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे. गुरु-शिष्य परंपरा प्राचीन असून फार मोठी आहे. गुरूंचे महत्व अनन्य साधारण आहे. असे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी सौ.क्रांती मॅडम, सौ.पुंडे मॅडम व शुभम सर तसेच पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.तेरणी हिने केले तर आभार कु.सुषमा चिखले या विद्यार्थिनीने केले. व शेवटी विश्व प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.