इचलकरंजी हा स्वतंत्र जिल्हा करावा ; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष हाळवणकर यांची मागणी

इचलकरंजी हा स्वतंत्र जिल्हा करावा ; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष हाळवणकर यांची मागणी 



विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्ह्यांच्या विभाजन करण्यासंदर्भात समिती गठीत केल्याची घोषणा केली होती. तेव्हा कोल्हापूर जिल्ह्याचे विभाजन करून इचलकरंजी हा स्वतंत्र जिल्हा करण्यासंदर्भात शिफारस करून पाठपुरावा करावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.आ.सुरेश हाळवणकर यांनी एका पत्राद्वारे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. दिलेल्या पत्रात, राज्यातील प्रशासकीय सोयीसाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यात २२ जिल्हे व ४९ तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचे शासनाने तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात मान्य केले होते. विभाजना संदर्भात निकष ठरविण्यासाठी २०१४ साली समिती गठीत केली होती. विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. दिलेल्या पत्रात, राज्यातील प्रशासकीय सोयीसाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यात २२ जिल्हे व ४९ तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचे शासनाने तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात मान्य केले होते. विभाजना संदर्भात निकष ठरविण्यासाठी २०१४ साली समिती गठीत केली होती. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचे विभाजन करून इचलकरंजी हा स्वतंत्र जिल्हा करावा अशी मागणी करणारा तारांकित प्रश्न सन २०१५ ला विधानसभेत उपस्थित केला होता. गठीत केलेल्या समितीचा अहवाल शासनाकडे सादर झाला आहे. या अहवालावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे कळविण्यात आले होते. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात १२ तालुक्यांचा समावेश असून जिल्ह्याचा विस्तार ७६८५ चौ.कि.मी इतका प्रचंड आहे. जिल्ह्याचे औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. हातकणंगले, शिरोळ व कागल तालुक्याचा स्वतंत्र जिल्हा करून त्याचे मुख्यालय इचलकरंजीत करावे.असे हाळवणकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post