मनपाचा विविध पर्यावरणपूर्वक उपक्रम राबविण्याचा निर्णय

 


 

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इचलकरंजी शहरात वृक्षारोपण, शहरातील महिला बचत गटांचे सक्षमीकरणासाठी विविध प्रकल्पामध्ये बचत गटांचे समावेशन, अधिकारी- कर्मचार्‍यांचे विविध विषयांवर प्रशिक्षण, शहरातील झोपडपट्टी परिसराची सुधारणा, 100 टक्के घरगुती वैयक्तिक शौचालयांचे ध्येय साध्य करणे, हरितगृह वायूचे उत्सर्जन अभ्यास व त्यावरील उपाय असे विविध पर्यावरणपूर्वक उपक्रम राबविण्याचा निर्णय महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागातील ’माझी वसुंधरा’ अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी शहरामध्ये पाणी आणि स्वच्छता केंद्र (सीडब्ल्युएस) च्या माध्यमातून विविध प्रकल्प व उपक्रम राबविणे संदर्भात बैठक पार पडली.

यावेळी शहरात सेप्टीक टाक्यांचे उपसा नियोजनबद्ध प्रकारे होईल त्यासाठी शेड्युल डी स्लजिंग प्रणालीची अंमलबजावणी करणे, विविध सार्वजनिक इमारतींवर सोलर प्रणाली स्थापित करणे आदींसह उपरोक्त निर्णय घेण्यात आले. यावेळी उपायुक्त तैमुर मुल्लाणी, सोमनाथ आढाव, प्र. सहा. आयुक्त केतन गुजर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, शहर समन्वयक प्रविण बोंगाळे, रमजान नदाफ आदी उपस्थित होते. तसेच सीडब्ल्यूएसचे सेंटर हेड दिनेश मेहता व श्रीमती मीरा मेहता, प्रोजेक्ट मॅनेजर असीम मान्सूरी, अरवा भरमाल, दिग्विजय केरकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post