महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव ते कोल्हापूरपर्यंत सर्वदूर राज्यात पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालीय. अनेक गावांना पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे गावाचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि उपनगरात रेल्वे सेवा ठप्प झालीय. सध्या तरी मुंबई ते डोंबिवली वाहतूक सुरु आहे. पण अंबरनाथ, बदलापूरहून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक ठप्प झालीय. पण मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प झालीय. कल्याण, भिवंडी, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. हवामान विभागाने पावसाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांना पावसाने झोडपले महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात 163 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व नद्याना पूर आलेला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईत सर्वाधिक पाऊस पडला आहे. तर राज्यातील एकूण 34 जिल्ह्यांना पावसाने अशरश: झोडपून काढलं आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव ते कोल्हापूरपर्यंत सर्वदूर राज्यात पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालीय. अनेक गावांना पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे गावाचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि उपनगरात रेल्वे सेवा ठप्प झालीय. सध्या तरी मुंबई ते डोंबिवली वाहतूक सुरु आहे. पण अंबरनाथ, बदलापूरहून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक ठप्प झालीय. पण मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प झालीय. कल्याण, भिवंडी, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. हवामान विभागाने पावसाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांना पावसाने झोडपले महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात 163 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व नद्याना पूर आलेला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईत सर्वाधिक पाऊस पडला आहे. तर राज्यातील एकूण 34 जिल्ह्यांना पावसाने अशरश: झोडपून काढलं आहे.