गायरान, गावठाण व वन विभागातील जमिनीवरील अतिक्रमणे कायम करावीत या मागणीसाठी 19 जुलै रोजी मुंबईत आझाद मैदान ते विधानभवन असा प्रागतिक पक्षांच्या सर्व घटक पक्षांकडून विशाल मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. देशातील गोरगरीबांच्या जमिनी हिसकावून घेऊन अतिक्रमणाच्या नावाखाली भूमिहीन करण्याचा डाव सरकारने आखला आहे, एकाही अतिक्रमण धारकाची जमिन आम्ही जाऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
Tags
स्थानिक बातम्या