जैन मुनि हत्या प्रकरणाची सीबीआय अंतर्गत चौकशी व्हावी : आचार्य श्री 108 कुलरत्नभूषण महाराजांची मागणी











हिरेकुडी तालुका चिकोडी येथील प.पू. 108 मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आले. जगाला अहिंसेचे संदेश देणारे व समस्त मानव कल्याणासाठी प्रार्थना करणाऱ्या जैन मुनिंची हत्या म्हणजे आपण भारत देशातच जगत आहोत का याचा संशय येत आहे. या हत्याप्रकरणी कर्नाटक शासनाकडून सीबीआय चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आचार्य श्री 108 कुलरत्नभूषण महाराजांनी केली. बोरगाव येथे समस्त दिगंबर जैन समाज यांच्या वतीने हिरेकुडी तालुका चिकोडी येथील प.पू. 108 मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आले. या हत्येचा जाहीर निषेध करण्यात येणार असून यासाठी मंगळवार 11 जुलै रोजी बोरगाव बंदीची हाक देण्यात आले होते. या बंदला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.समस्त दिगंबर जैन समाजाबरोबरच इतर सर्वच समाजातील नागरिक एकत्र येऊन संपूर्ण शहरातून मूक मोर्चा काढले व दोशींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली यावेळी बोलताना कर्नाटक जैन असोसिएशनचे संचालक उत्तम पाटील यांनी, मुनी हत्या प्रकरण कर्नाटक शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून दोषींवर कारवाई व्हावी असा आदेश तातडीने मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी दिल्याने आज सर्वच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. गृह मंत्रालय कडूनही विशेष सूचना आल्या असून यापुढे आपल्या जैन तीर्थक्षेत्र व जैन मुनि महाराजांना पोलीस दलाकडून संरक्षण देण्यात येणार असल्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. हत्या प्रकरण सीबीआय चौकशी व्हावी अशी सर्वांचीच मागणी असून शासन आपल्याला योग्य न्याय देईल असा आपल्याला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. माजी.जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले यांनी, राज्यातील अल्पसंख्याकांना सुरक्षा मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे पण या मागणीची दखल घेतली जात नाही तरी शासनाने यापुढे अल्पसंख्याकांना व आपल्या समाजातील जैन मुनिंना सुरक्षा द्यावी अशी मागणी असून शहरातील समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने या मागणीची चे निवेदन पटण पंचायतचे मुख्याधिकारी द्वारे मुख्यमंत्री व गृहमंत्रालयाकडे पाठवीत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी मुख्याधिकारी नरस रेड्डी यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडयीनकर, द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे, पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, महसूल निरीक्षक संदीप वाइंगडे , नगरसेवक शरद जंगटे, उल्हास निकम, बि.जे. पाटील, उमेश वास्कर, राजु गजरे, परवेझ अफराज, प्रदीप माळी, बी.के.महाजन, शिवाजी भोरे, बाळू बसनावर, पृथ्वीराज पाटिल, शिवप्पा माळगे, भाऊसाब बंकापुरे, विद्याधर अम्मनावर, अभय करोले, सुभाष शेट्टी, तुळशीदास वसवाडे, जावेद मकानदार, राजु मगदूम, अजित, तेरदाळे, संगप्पा ऐदमाळे, मनोज पाटील, अशोक पाटील, शोभा हवले, सुरेखा घाळे, यांच्यासह सर्वच समाजातील नागरिक उपस्थित होते. बंद पुकारण्यात आल्यामुळे शहरातील सर्वच व्यापारी, शाळा, महाविद्यालय, सहकारी संघ संस्था, यांनी एकदिवशीय बंद पाळुन आपला पाठिंबा दिला. शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तीन राखीव पोलीस तुकडी व पोलीस फाटा बंदोबस्तात ठेवण्यात आला होता.

बोरगांव हुन : सुशांत किल्लेदार

Post a Comment

Previous Post Next Post